पाळधी चे 13 तरुण युवकांचा संपर्क होईना
पालकमंत्री गुलाबराव पाटील तात्काळ दिल्लीला रवाने

पाळधी – ता.धरणगाव येथील माळी वाडा परिसरातील 13 युवक व चालक व चालकाचा सारथी हे मित्र परिवार 27 जुलै रोजी पाळधी येथून टेम्पोट्रॅव्हल गाडी क्रमांक 19, सी वाय 2202 ने निघाले असून आजपर्यंत त्यांचा संपर्क होऊ शकला नसून शेवटचा संपर्क दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी झाला होता त्या नंतर त्या युवकांचा संपर्क आता पर्यंत होऊ शकत नसल्या मुळे त्या युवकांचा परिवार चिंताग्रस्त आहे ही बातमी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांना कळल्याने पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील तातळीने दिल्ली ला रवाना झाले असून आपत कालीन कक्ष यांच्याशी सतत संपर्क साधत आहे मंत्री मोहदय आज रात्री दिल्लीहुन उत्तर काशी येथे रवाना होणार असून पालकमंत्री व पाळधी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे संपर्क होण्यासाठी जोरदार प्रयन्त सुरू आहे
संपर्क होत नसलेले युवकांचे नावे
रोहन दिनेश माळी, रोहित बंडू माळी, मनोज संजय चौधरी, ज्ञानेश्वर संजय माळी, दिपक रत्नाकर सोनार, संगदीप भारत नंनवरे, दीपक माळी, वैभव गंगवने, संदीप माळी, अक्षय पाटील सुरत, रिंकेश खुशाल माळी, भूषण सुरेश माळी, पवन माळी असे नावे आहेत




